टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचा सन्मान दिल्ली येथे मा. पंतप्रधानांनी केला. आज संध्याकाळी भारतीय संघ मुंबईत पोहोचणार असून वानखेडे स्टेडिअम येथे सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल हे चार खेळाडू मुंबईकर आहेत. टी-२० विश्वचषकमध्ये या सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून देशाची मान अभिमानाने उंचावली. मुंबईत स्थित असलेल्या या चारही खेळाडूंचा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यथोच्छित सन्मान करण्यात यावा, अशी विनंती सभागृहात मा. अध्यक्षांना केली.
या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन खेळाडूंचा सन्मान करण्याबाबत कार्यक्रम नियोजित केला जाईल असे आश्वास्त केले.
#PratapSarnaik #shivsena #TeamIndia #cricket #t20worldcup2024 #champions #Maharashtra #Monsoonsession #पावसाळीअधिवेशन२०२४ #Monsoonsession2024